सर्वमान्य अंक ‘१२’.
वर्षाचे महिने १२, डझनाचे नग १२, एका फुटाचे इंच १२, घड्याळातले तास १२, पंचांगाप्रमाणे राशी १२ इत्यादी. म्हणजे १२ हा अंक सामान्यपणे सर्वच प्रकारच्या मोजमापाला वापरला जातो. काय आहे या १२ अंकाचे रहस्य? का १२ अंकाला एवढे महत्व? तो जागतीक स्तरावर वरील मोजमापात वापरला जातो, म्हणजेच तो सर्वमान्य असा अंक आहे हे महत्वाचे. या १२ अंकाचे असे अनन्य साधारण महत्व काय आहे हे समजण्यासाठी भारतीय कालगणनेचा प्राचीन इतिहास समजावून घ्यावा लागेल.
भारतीय कालगणना - परिचय.
पृथ्वीची छाया चंद्रावर पडून दर दिवशी ती पौर्णिमेपासून अमावश्येपर्यंत वाढत जाऊन, अमावस्येला चंद्र त्या छायेखाली पुर्ण झाकला जातो. त्या दिवशी चंद्र दर्शन होत नाही. हा १५ दिवसांचा कालखंड ‘शुक्ल पक्ष’ म्हणून मानला जातो. अमावस्येनंतर दर दिवशी चंद्र या छायेतून थोडा थोडा बाहेर येतो, म्हणजे दर दिवाशी तो थोडा थोडा प्रकाशमान होत, पौर्णिमेला तो संपुर्ण प्रकाशमान होतो. हा १५ दिवसांचा कालखंड ‘कृष्ण पक्ष’ म्हणून समजला जातो. अशा रितीने पौर्णिमा ते पौर्णिमा किंवा अमावस्या ते अमावस्या असा ३० दिवसांचा एका महिन्याचा कालखंड होतो. चंद्रावर पडणाऱ्या रोजच्या छायेच्या आकारानुसार दिवसांना संस्कृत नांवे दिली आहेत, ज्यांना तिथी असे म्हणतात.
भारतामध्ये प्रत्येकी दोन महिन्यांचे ६ ऋतु होतात, आणि असे ६ ऋतु फक्त भारतातच होतात. एक ऋतुचक्र पुर्ण होण्यासाठी (६ऋतु x २ महिने) १२ महिने लागतात हे अतिप्राचीन काळापासून भारतीय विद्वानांना माहीत होते. हे ऋतुचक्र भारताच्या शेतीसाठी अत्यंत महत्वाचे होते आणि आजही आहे. म्हणून याची ओळख सर्वसामान्य भारतीयांना होती आणि आजही आहे. अशा प्रकारचे ३० दिवसांचा एक महिना आणि १२ महिन्यांचे एक वर्ष हे प्राचीन भारतात प्रचलित होते. त्या काळी फक्त वर्ष गणना, म्हणजे एका वर्षानंतर दुसरे वर्ष, तिसरे वर्ष अशी गणना होत नव्हती. तरीही भारताने जगाला ७ दिवसांचा आठवडा (संदर्भ - दिवसाला [वारांना] धार्मिक महत्व आहे का?), ३० दिवसांचा महिना आणि १२ महिन्यांचे एक वर्ष हे निसर्गचक्रावर आधारित नित्य आणि स्थिर अशी खगोलीय देणगी सर्वप्रथम दिली.
‘१२’ अंकाचा मुलभूत पाया
वेदिक काळापासून वापरात असलेली भारतीय चांद्र दिनदर्शिका ही एकमेव अशी प्राचीन खगोलीय दिनदर्शिका आहे. ‘वेदांग ज्योतिष’ हा ग्रंथ इ.स. पुर्व १५०० मध्ये लिहीला गेला होता. १२ महिन्यांचे नैसर्गिक घटनांवर आधारित चांद्र वर्षीच्या आधारे १२ या अंकाचा मुलभूत पाया भारतीय ऋषी-मुनींनी वेदिक काळातच घातला होता याबद्दल दुमत नसावे.
सर्वमान्य अंक १२
कोणत्याही गोष्टीच्या प्रमाणीकरणांसाठी ‘नियमीत पुनरावृत्ती करणाऱ्या नैसर्गीक घटनेशी निगडीत असणारा स्थिरांक’ असावा लागतो. असा जगातला पहिला स्थिरांक चांद्र वर्षीय १२ महीन्यांच्या संदर्भातून मिळाला, जो नित्य पुनरावृत्ती करणारा, नैसर्गिक घटनांवर आधारीत आहे. म्हणून १२ हा अंक सर्वमान्य असा मुलभूत स्थिरांक मानुन जगभरांत सर्व मोजमापांत ‘पायाभूत अंक’ म्हणून वापरला गेला.
कांही पाश्चात्य लोक १२ हा ‘डूओडेसिमल’ (duodecimal) म्हणजे १२ हा पायाभूत आधार असलेला अंक म्हणून मोजमापांत घेतला असे प्रतिपादन करतात. परंतु डूओडेसिमल ही लॅटीन पध्दती इ.स. १७०० मध्ये प्रस्थपित केली गेली. आणि महत्वाचे म्हणजे डूओडेसिमल मधला १२ हा पायाभूत आधार चांद्र वर्षीय १२ महीने हाच आहे हे विसरता कामा नये.
१२ राशींची कल्पना
१२ महीन्यांत पृथ्वीची सुर्याभोवतीची एक प्रदक्षिण पुर्ण होते, म्हणजेच एक भ्रमण वर्तुळ पुर्ण होते. या वर्तुळाचे १२ महिन्यांच्या हिशोबाने १२ भाग केले, प्रत्येक भागाला ‘राशी’ म्हणून संबोधले. वर्तुळाच्या ३६० अंशांचे १२ भाग झाल्याने प्रत्येक राशी ३० अंशांचे झाली. अशा रितीने १२ राशींची कल्पना मांडली गेली.
कांही पाश्चिमात्यांच्या म्हणण्या नुसार राशी किंवा Zodiac हे इजिप्तीशिअन किंवा बॅबीलाॅनीयन (इ.स. पूर्व १८९४ ते इ.स. पूर्व १५९५) यांनी प्रस्थापित केल्या. परंतु याला कोणताही शास्त्रोक्त पुरावा नाही. या दोन्ही संस्कृती सुर्याला देव मानत, सुर्यपुजक होते एवढेच. त्यांनी खगोलशास्त्रचा कधीच अभ्यास केला नाही, तसा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. इजिप्त मध्ये सुर्याच्या विशिष्ट ठिकाणी उदय होई, त्याच्या नंतर नाईल नदीला पुर येतो, एवढाच त्यांचा खगोल शास्त्राशी संबंध. सुर्याशिवाय इतर कोणते तारे किंवा ग्रह आहेत यांची त्यांना माहिती सुध्दा नव्हती. त्यामुळे इजिप्तीशिअन लोकांनी राशी प्रस्थापित केल्या या म्हणण्याला कोणताही संदर्भ नाही.
इसवी सन पुर्व ३२० च्या दरम्यान ग्रीक भारतात आले. त्यांनी भारतीय खगोलशास्त्राचा अभ्यास केला आणि ते ज्ञान आपल्या देशात नेले. परंतु ग्रीकांनी राशी प्रस्थापित केल्या याला ही काही संदर्भ नाही.
वेदिक काळापासून भारतीय चांद्र वर्ष कालमापन होत होते. फक्त काल गणना होत नव्हती. सध्या आपण जे इंग्रजी कॅलेंडर वापरतो ते ‘ग्रेगोरियन कॅलेंडर’ १५ ॲाक्टोबर १५८२ रोजी अस्तित्वात आले, म्हणजे फक्त ४३८ वर्षांपूर्वी . परंतु भारतीय चांद्र पंचांग गेल्या ३००० वर्षापासून, वेदिक काळापासून वापरात आहे. भारतीय वर्ष गणना महावीराच्या काळापासून सुरु झाली. सध्या ‘महावीर संवत २५४५-४६’ चालू आहे. तसेच शालिवाहन राजाच्या काळापासून ‘शालिवाहन शक’ सुरू केले गेले. सध्या शालिवाहन शक १९४१ चालू आहे, तर ग्रेगोरिअन कॅलेंडर प्रमाणे सध्या इ.स. २०२०-२१ चालू आहे. म्हणजे भारतीय वर्ष गणना ‘महावीर संवत’ हे इसवी सनापुर्वी ५२५ वर्षापासुन चालू आहे.
वर्तुळाचे ३६० अंश
वर्तुळाच्या ३६० अंशांनाही भारतीय चांद्रवर्षाचा पाया घेतला गेला आहे. ३० दिवसांच्या १२ महिन्यांत पृथ्वीची सूर्याभोवती एक प्रदिक्षणा पुर्ण होते. म्हणजेच ३० दिवस x १२ महिने =३६० दिवसात एक प्रदिक्षणा पुर्ण होते. म्हणून पृथ्वीच्या सुर्याभोवतीच्या भ्रमण वर्तुळाचे ३६० भाग केले, ज्याला अंश म्हटले गेले. त्यावरून कोणत्याही वर्तुळाचे ३६० अंश हे प्रमाणित केले गेले.
एका डझनाचे १२ नग
प्राचीन भारतात ‘नग’ मोजण्यासाठी ‘१२ नगांचा’ एक संच प्रमाणित केला गेला. त्यामागे एकच कारण होते, ते हे कि, ‘वर्षाचे १२ महिने असतात’ हे त्या काळच्या जनतेच्या कायम लक्षांत रहावे. त्या काळी महिन्याला ‘मास’ म्हणत असत. (आजही ग्रामीण भागात मास हा शब्द प्रचलित आहे. ‘अधिक मास’ हा शब्द प्रयोग आजही रूढ आहे). म्हणून ‘१ मास’ म्हणजे १२ (महिन्याच्या) संच’ या धर्तीवर वस्तूंची गणती होत असे. १२ नग मोजतांना, अंगठा सोडून हाताच्या चार बोटांची ‘पेरे’ मोजली किंवा दिर्देशीत केली जात. (एका बोटाला ३ पेरे असतात, अगठ्याला मात्र दोन). त्यामुळे एका हाताच्या अंगठ्याने, त्याच हाताच्या बोटाची पेरे मोजणे किंवा निर्देशीत करणे सोपे जात असे.
पुढे ब्रिटिशांनी याला ‘डझन’ असे संबोधले. डझन हा शब्द जुन्या फ्रेंच शब्द ‘ड्यूझेन’ (douzain) वरून इंग्रजीत ‘डझन’ म्हणुन वापरला गेला. ड्यूझेन म्हणजे ‘१२ चा संच’. १२ चा संच असलेली ‘ड्यूओड्सिमल’ पध्दत पुर्वी ‘मेसोपोटाॅमिया’ या साम्राज्यांत बनली होती. परंतु या १२ च्या संचाचा संदर्भ पुन्हा भारतीय १२ चांद्रमहिन्यांशीच आहे.
डझनाच्या पुढे १२ x १२ (१२ चा वर्ग) १४४ नग म्हणजे एक ‘ग्राॅस’ आणि १२ x १२ x 12 (१२ चा घन) १७२८ नग म्हणजे एक ‘ग्रेट ग्राॅस’! पुन्हा १२ चा पाय वापरला गेला.
एका फुटाचे १२ इंच
प्राचीन काळी इजिप्त, ग्रीस आणि भारतामध्ये (सिंधू संस्कृतीमध्ये) लांबी किंवा अंतर मोजण्यासाठी पावलांचा उपयोग केला जात असे. ‘पाऊल’ म्हणजे पायाच्या टाचेच्या मागच्या भागा पासून अंगठ्याच्या टोका पर्यंतचा भाग. अर्थात वेगवेगळ्या व्यक्तींच्या पावलांचा आकार (लांबी) वेगवेगळी असल्याने मोजमापात फरक पडत असे. पुढे वेगवेगळ्या देशांच्या राजांच्या पावलाच्या आकारावुसार त्या त्या देशांतील लांबी किंवा अंतरांचे मोजमाप होत असे. या पावलांच्या लांबी वरून अंतर मोजण्याच्या एकांकाला इंग्रजांनी फुट (foot) म्हणजे पाऊल असे संबोधले.
परंतु अचूक मोजमापासाठी अजून लहान लांबी मोजण्याचे प्रमाण हवे होते. १४ व्या शतकांत ब्रिटिश राजा एडवर्ड दोन (King Edward II) याच्या कार्यकाळांत ‘इंच’ या अकांकाची व्याख्या केली गेली, ती अशी - “वाळलेल्या बार्ली धान्याचे तीन दाणे लांबीनुसार एकमेकांना लावल्यावर जी लांबी येते ती ‘एक इंच लांबी’.
पुढचे ‘फुट’ या एकांकाचे प्रमाण ठरवताना पुन्हा भारतीय १२ चांद्र महिन्यांचा संदर्भ घेऊन, किंवा १२ या नैसर्गीक स्थिरांकाचा संदर्भ घेऊन “१२ इंच म्हणजे एक फुट” हे प्रमाणित केले गेले.
घडाळातचे १२ तास
वाराह मिहीर, जो आर्यभट्टाचा समकालीन होता (इ.स. ५वे-६वे शतक) या महान गणिती आणि खगोल शास्त्रज्ञाने, १२ महिन्यांच्या स्थिरांकाच संदर्भ घेत, ‘सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंतच्या काळाचे (दिवसाचे) १२ भाग केले, तसेच सुर्यास्तापासून सुर्योदयापर्यंतच्या काळाचे (रात्रीचे) १२ भाग केले. प्रत्येक भागाला त्याने ‘होरा’ असे नाव दिले. म्हणून सुर्योदयापासून सुर्योदयापर्यंतच्या एका दिवसाचे २४ होरा (भाग) झाले. पुठे आर्यभट्टाने याच होरांचा उपयोग करुन, एका विशिष्ट सुत्रानुसार, आठवड्याचे ७ दिवस ठरवून त्यांना, सोमवार ते रविवार अशी संस्कृत नावे दिली. {वाचा लेख - दिवसांना (वारांना) धार्मिक महत्व आहे का?).
अशा रितीने वराह मिहीराने १२ होरांचा दिवस आणि १२ होरांची रात्र याचा पाया घातला. पुठे इ.स. १६५६ मध्ये ‘ख्रिस्टियन हायगेन्स’ या ‘वेळेचा अभ्यास’ करणाऱ्या डच शास्त्रज्ञाने घडाळाचा शोध लावला. होरांचे ‘तास’ झाले (Hora - Hour) आणि २४ तासांचा एक दिवस झाला.
घडाळ्यात १२ तास हे दिवसाचे घरून केले गेले, जे रात्रीचे पण तास होतात आणि एक दिवस २४ तासंचा होतो.
एका तासाचे ६० मिनीटे
वेळेच्या अचूक मोजमापासाठी एका होराचे (तासाचे) विभाजन करणे आले. हे विभाजन करताना सुक्ष्मतेसाठी एका राशीचे दुप्पट भाग केले. एक राशी ३० अंशांची असते म्हणून ३० x२ = ६० भाग झाले. एक होरा म्हणजेच एक तास, त्याचे ६० भाग म्हणजे ६० मिनिटे झाली. म्हणून एका तासाचे ६० मिनिटे झाली. तसेच एका मिनिटाचे ६० भाग करून ६० सेकंदांचा एक मिनिट झाला.
घडाळाचे काटे वर्तुळाकार फिरतात, म्हणजेच ३६० अंशात फिरतात. म्हणून जशी एक राशी ३० अंशांची होते, तसेच घडाळाचा एक तास (होरा) ३० मिनिटांचा होतो. याच सुत्रानुसार वर्तुळाचे ३६० अंश होतात आणि एका अंशाची ६० मिनिटे आणि वर्तुळाच्या एका मिनिटाचे ६० सेकंद होतात.
निष्कर्ष
अशा रितीने सर्व मोजमापाच्या एकांकांच्या अचूक मोजमापासाठी जे सुक्ष्म विभाजन केले ते १२ या चांद्र महिन्यांचा पाया घेऊनच. या शिवाय १२ हा अंक स्थिरांक असावा या साठी दुसरा कोणताही नैसर्गीक संदर्भ लागत नाही.
आर्यभट्ट, वराह मिहीर, भास्कराचार्य, बिरम्हगुप्त वगैरे भारतीय गणितज्ञांनी आणि खगोल शास्त्रज्ञांनी जगाला गणिताचा, भूमितीचा, मोजमापासाठीच्या १२ या स्थिरांकाचा पाया घालून देण्याचे महान कार्य केले.
आर्यभट्टाने शुन्याचा नुसता शोध लावला एवढेच नाही तर शुन्याला ‘मुल्य’ देऊन त्याचा संख्यात्मक उपयोग करून कोणतेही मुल्य काढण्याची सोपी पध्दत दिली. तसेच अधूनिक जगाला दशमान पध्दतीचा पाया ही घालून दिला. आर्यभट्टाच्या आधी शुन्याचा वापर फक्त ‘चिन्हांकित’ पध्दतीने (ज्याला मुल्य नाही, फक्त ते एक चिन्ह दर्शवते) इजिप्त, बॅबीलॉन, सुमेरिया इत्यादी देशांत केला गेला. परंतु शुन्याचा संख्यत्मक पध्दतीचा उपयोग करून आर्यभट्ट जगांत अजरामर झाला. ब्रम्हगुप्त या गणितज्ञाने सर्वप्रथम शुन्याचा उपयोग करून अगणित अशा गणितांचे नियम घालून दिले.
सतीश संगावार.
